चाणक्य नीती – जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यश आणि आनंद मिळवण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या ७ सवयी लावून घ्या.
चाणक्य नीती नुसार जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद आणि यश मिळवण्यासाठी माणसाने आपल्या अंगी काही गुण जोपासले पाहिजेत. जर आपण आपल्या अंगी हे 7 गुण जोपासले तर आपण आपले ध्येय सहज प्राप्त करू शकतो.
आचार्य चाणक्यांनी अशा सात गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आत्मसात करून प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आनंद आणि यश, आदर आणि प्रशंसा प्राप्त करू शकतोचला तर माग त्या सात गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
चाणक्य नीती मधील या सवयी तुम्हाला यश आणि आनंद मिळवून देतील :
- सद्गुण : प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंगी सदगुणाची जोपासना केली पाजिजे, जर व्यक्तीच्या अंगी सद्गुणच नसतील तर यश प्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न असफल ठरतील. त्यासाठी प्रामाणिकपणा, सचोटी, सहानुभूती आणि नम्रता हे सद्गुण अंगीकारा. हे सद्गुण निश्चितच तुमचे व्यक्तिमत्व उंचावतील त्याचबरोबर तुम्हाला सभोवतालच्या लोकांकडून आदर आणि प्रशंसा देखील मिळवून देतील.
- निश्चित ध्येय : चाणक्यांनी सांगितले आहे की व्यक्तीला आयुष्यात जर एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी प्रामाणिक मेहनत करणे गरजेचे आहेच. पण ती गोष्ट सध्या करण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नाही. तर त्यासाठी ध्येय निश्चित असणे गरजेचे आहे. निश्चित ध्येय व्यक्तीला त्यांच्या दिशेने परिश्रमपूर्वक कार्य करण्यास प्रोत्साहित करते. त्यासाठी व्यक्तीच्या आयुष्यात ध्येय असणे आवश्यक आहे. विशिष्ट ध्येयाविना केलेली मेहनत व्यर्थ आहे. त्यासाठी आपल्या आयुष्यात एक ध्येय सेट करा आणी ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा.
- सतत शिकणे : ज्ञानाचा शोध हा कधीही न संपणारा प्रवास आहे. त्यासाठी रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने विविध स्त्रोतांमधून सतत नवीन शिकत राहिले पाहिजे.
- स्वयं-शिस्त : स्वयं-शिस्त ही आव्हाने जिंकण्याची आणि यश मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. स्वयं-शिस्त तुम्हाला तुमच्या ध्येयांवर एकाग्र राहण्यास मदत करते. शिस्तीशिवाय माणसाचे जीवन निष्क्रीय होते. एक शिस्तप्रिय व्यक्ती कोणत्याही कठीण परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकते आणि कोणतीही अडचण योग्यरिया हाताळू शकते. जीवनाच्या प्रत्येक यश प्राप्त्या करण्यासाठी स्वयं-शिस्त हे एक आवश्यक आणि उपयुक्त कौशल्य आहे.
- योग्य संगत : एका वाईट मित्रापेक्षा दहा शत्रू चांगले असतात. जीवनात जर आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी योग्य संगत असणे आवश्यक आहे. आपण ज्यांची संगत करतो त्यांचे विचार आपल्या मानसिकतेवार प्रभाव करत असतात. वाईट लोकांची संगत आजच सोडून द्या आणी अशा लोकांची संगत करा ज्यांच्या सानिध्यात राहून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा, चांगली प्रेरणा मिळेल.
- परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय : जीवन गतिमान आहे आणि बदल अपरिहार्य आहे. त्यामुळे आज आहे तीच परिस्थिती उद्या असेल असे नाही. झालेले बदल स्वीकारा परिस्थिती कशी जरी असली तरी तुमच्या तत्त्वांवर व ध्येयावर स्थिर राहून त्या परिस्थितीशी जुळवून घेवून त्यातून मार्ग काढा. यामुळे तुमची जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
- कृतज्ञता : कृतज्ञता हे एखाद्या व्यक्तीचे मन जिंकण्याचे शक्तिशाली साधन आहे. आयुष्यात आपल्या ध्येयकडे वाटचाल करत असताना कृतज्ञ राहा.कृतज्ञता समाधान वाढवते आणी समाधान सकारात्मकतेला आकर्षित करते त्यामुले आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा.
चाणक्य नीती नुसार सद्गुण, निश्चित ध्येय, सतत शिकत राहणे, स्वयं-शिस्त जोपासणे, योग्य संगत निवडणे, परिस्थितीशी जुळवून घेणे आणी कृतज्ञ राहणे. या सात सवयी आपल्या अंगी धरण करा या सवयी तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश मिळण्याचा मार्ग सोपा करतील.